नांदुरा:- समाजसेवा, लोकसंपर्क आणि निर्णायक राजकीय पाठिंब्याच्या बळावर नागरिकांनी केला 'सरिता ताई' यांना नगरसेविका म्हणून निश्चित प्रभाग क्रमांक 11 मध्ये येत्या 2 डिसेंबर २०२५ नगरपरिषद निवडणुकीसाठी एकच नाव नागरिकांच्या मुखी आहे, ते म्हणजे सरिता ताई बावस्कार यांचे. त्यांच्या साधेपणामुळे, अखंड समाजसेवेमुळे आणि लोकांच्या सुख-दुःखात सहभागी होण्याच्या वृत्तीमुळे सरिता ताईंनी प्रभागात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या प्रचाराला नागरिकांकडून भरभरून आणि उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.जनतेच्या प्रश्नांची जाण सरिता ताई बावस्कार यांनी केवळ निवडणुकीच्या तोंडावर नव्हे, तर सातत्याने लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घेतला आहे.युवती व महिलांचे संघटन युवती आणि महिलांचे यशस्वी संघटन करून त्यांना सामाजिक आणि राजकीय प्रवाहात आणण्याचे त्यांचे कार्य विशेष उल्लेखनीय आहे.निर्णायक राजकीय पाठिंबा मिळालेल्या सरिता ताईंच्या या लढ्याला अपक्ष उमेदवार लाला भाऊ इंगळे यांचा आणि विशेषतः शिवसेना जिल्हाध्यक्ष (बुलढाणा) संतोष भाऊ डिवरे यांच्यासह शहरातील सर्व शिवसैनिकांचा खंबीर पाठिंबा मिळाला आहे.या पाठिंब्यामुळे सरिता ताईंची बाजू अधिक मजबूत झाली आहे.या सर्व घटकांमुळे, प्रभागातील नागरिक आता उघडपणे "आमचा नेता म्हणजे नगरसेविका सरिता ताई" असे म्हणत असून, त्यांनी सरिता ताईंना आपला पुढील नगरसेविका म्हणून निश्चित केले आहे.या वाढत्या प्रतिसादामुळे, प्रत्येक नागरिकाच्या तोंडी असलेल्या सरिता ताईंच्या समाजसेवी कार्यामुळे आणि मिळालेल्या महत्त्वपूर्ण राजकीय पाठिंब्यामुळे त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे.प्रभाग क्रमांक ११ मध्ये विकासाचे नवे पर्व सरिता ताईंच्या नेतृत्वाखाली सुरू होईल, अशी आशा नागरिकांनी व्यक्त केली आहे.
शिवसेना उमेदवार (शिंदे गट) प्रभाग क्र. ११ मध्ये सरिता ताई बावस्कार यांच्या नावाची शहरभर जोरदार चर्चा,युवा नेतृत्वावर मतदारांचा भरघोस कौल...
Hanuman Sena News
0
إرسال تعليق